पुणे : पुण्यातील दिघी पोलीस ठाणे हद्दीतील धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चार महाराजांसह ईतर तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आळंदी येथे राहत असलेल्या ४८ वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे, आत्याचा करणाऱ्यांपैकी दोन वारकरी कीर्तनकार असल्याचे समोर आले आहे.
पिढीत महिला आळंदी येथे राहाणेस असुन तिने दि. २४ एप्रिल २०२६ रोजी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की
दिलेल्या फ की दि. १६/०३/२०२६ रोजी अभिमन्यु अंधाळे, सुनिता आंधळे, नारायण महाराज खंदारे हे तिघे दुपारी तीन वाजताचे सुमारास माझे घरात आले व त्या तिघानी मला मारहाण केली. त्याबाबत मी दिघी पोलीस स्टेशन येथे दिं. २८/०३/२०२६ रोजी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर त्याचा रागातून आंधळे पती पत्नी हे दिंनाक ०७/०४/२०२६ रोजी सुनिता आंधळे हीची बहीण आश्विनी, नारायण खंदारे, हे चौघे माझ्या घरी संध्याकाळी ०६:०० वाजण्याचे सुमारास आले. त्यावेळी मी घरात झाडू मारत होते सुनिता आंधळे हीने अचानक माझे तोंड दाबले व मला ओढत आतल्या खोलीत नेले. त्यावेळी आश्विनी हीने माझ्या गळयात असलेले मण्याचे मंगळसुत्र काढुन घेतले तेव्हा मी ओरडु लागल्याने अभिमन्यु आंधळे हा तेथे आला व त्याने मला ओढत बाथरूम मध्ये नेले व त्याच्या वरच्या खिशातुन पांढया रंगाचे हातमोजे काढुन स्वताचे हातात घातले व त्यांने त्याचे सोबत आणलेले कंडोम त्याचे लिंगावर घातले व मला बाथरूम मध्ये खाली झोपवुन माझ्या सोबत जबरदस्तीने शारीरीक संबंध केले. त्यानंतर त्याने त्याचे लिंगावरील घातलेले कंडोम काढुन माझ्या तोंडावर फेकले व तो बाहेरच्या खोलीत निघुन गेला. मी बाथरुममध्ये माझा चेहरा नळाच्या पाण्याने धुत असताना बाथरूम मध्ये नारायण खंदारे आला व त्यानी मला मागुन मिठी मारून माझ्या छातीला दाबले व मला शिवीगाळ केली व मला म्हणाला ” हे तुझे घर आमचे नावावर कर नाहीतर, ते घर विकुन आम्हाला पैसे दे, नाहीतर आम्ही तुला आसाच त्रास देत राहु” असा तो म्हणत असताना तेवढयात बाहेरून सुनिता आंधळे हीने चला चला येथुन लवकर निघा असा आवाज दिल्याने ते सर्व माझे घरातुन बाहेर जात असताना मला धमकी देवुन गेले की, जर तु आमची तक्रार करण्यासाठी कोठे गेली तर आम्ही बाळासाहेब सानप व धनराज गुटटे यांना सांगुन तुझ्यावर खोटे गुन्हे दाखल करू असे म्हणुन ते चौघे तेथुन निघुन गेले.
तसेच चारपाच महिन्यापुर्वी तारीख वार आठवत नाही रात्री ०९:३० वाजण्याच्या सुमारास मी घरासमोर शेजा-यासोबत गप्पा मारत असताना माझ्या घरात श्याम महाराज राठोड महाराज, राहुल सुरेश चोरडीया व कानीफनाथ गुलाबराव घुले हे तिघे घुसले. मी लगेच त्याचेमागे घरात गेले असता राहुल सुरेश चोरडीया याने माझ्या हाताला धरून ओढले व माझेसोबत जबरदस्तीने शरीरसंबंध केले. त्याचवेळी कानीफनाथ घुले यानी मी खाण्यासाठी केलेल्या भाताच्या पात्याल्यात लघवी केली व त्यानी देखील माझे सोबत जबरदस्तीनें शारीरीक संबंध केले त्यावेळी श्याम महाराज हा घराबाहेर असलेल्या गाडीत बसलेला होता. या घटनेच्या तिस-या दिवशी परत कानीफनाथ घुले व युवराज खरमाटे हे दोघे रात्रीचे ११:०० वाजताचे सुमारास माझे घराजवळ आले व घराचा दरवाजा वाजवु लागले परंतु मी घराचा दरवाजा उघडला नाही. त्यामुळे युवराज खरमाटे यांने मला शिवीगाळ करून मी तुझी सोशल मिडीयावर बदनामी करेन अशी धमकी दिली व त्याने सोशल मिडीयावर माझेबाबत अक्षेपार्ह मजकुर प्रसारीत केला त्यामुळे माझी त्यादोघांविरूदध कायदेशीर तक्रार आहे.
सदरील महिलेच्या फिर्यादीवरून दिघी पोलिस ठाण्यात सुनिता आंधळे, अभिमन्यु आंधळे, नारायण खंदारे, श्याम महाराज राठोड, राहुल सुरेश चोरडीया, कानीफनाथ गुलाबराव घुले, युवराज खरमाटे या ७ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ७०, ३०९(४), ११५ ( २), ३५१(२),३५२, २५६(२),३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा वारकरी संप्रदायाला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे.















