छत्रपती संभाजीनगर : मनोज जरंगें यांच्या काही तासांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी इंदापूर तालुक्यातील रामभाऊ जमदाडे यांचे बीड जवळील मांजरसुंबा येथे अपघाती निधन झाले. या निधनाने इंदापूर तालुका हळहळ वक्त करत होता तर दुसरीकडे संताप देखील व्यक्त करत आहे. ज्या आंदोलनाला मनोज जरांगे एकटे बसणार होते त्या आंदोलनाला समाजबांधव का बोलावले असा सवाल उपस्थित केला जात आहे? मनोज जरांगे यांनी जनतेला आवाहन केले नसते तर कदचित जमदाडे बंधू यांचा जीव वाचला असता मात्र मनोज जरांगे यांची प्रसिद्धीची हाव समाजबांधवांचे बळी घेत आहे असा थेट आरोप मराठा योद्धा अमोल खुने यांनी केला आहे. ते पुढे बोलताना म्हणाले कालच्या आंदोलनाला समाजबांधव बोलावण्याची गरज नव्हती मात्र जरांगे यांना समाजाच्या जीवावर प्रसिद्धी मिळवायची आहे, आपल्या सहकाऱ्यांना सरकारवर दबाव टाकून टेंडर मिळवायचे आहेत, पैसे कमवायचे आहेत. कालच्या आंदोलनाला मनोज जरांगे यांच्या आवाहनाला साथ देत माझे बंधू जमदाडे हे आले होते त्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे, त्यांना बोलावण्याची गरज नसताना मनोज जरांगे यांनी बोलावले त्यामुळे त्यांच्या मृत्यूला मनोज जरांगे जबाबदार आहे त्याच्या सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून मनोज जरांगे यांना जेलमध्ये टाका अशी मागणी अमोल खुने यांनी केली आहे. त्याचबरोब ज्या जमदाडे बंधूंचे निधन झाले त्यांच्या कुटुंबीयांना भेट देण्याचे सोडून मनोज जरांगे दुबईला जात आहेत, मनोज जरांगे यांना फक्त प्रसिद्धीची हाव आहे समाजाचे काही देणे घेणे नाही असेही अमोल खुणे यांनी म्हटले आहे.
खरा मराठा योद्धा अमोल खुने यांची सडकून टीका आणि दौरा निश्चित

अमोल खुने यांनी जमदाडे बंधू यांच्या निधनानंतर मनोज जरांगे यांच्यावर त्यांच्या कुटुंबीयांना न भेटल्याच्या कारणावरून मनोज जरांगेवर सडकून टीका केली होती आणि मी लवकरच स्व.रामभाऊ जमदाडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार असल्याचे दोन दिवसापूर्वी मराठी महाराष्ट्र न्यूज शी बोलताना म्हटले होते. एकीकडे अमोल खुने यांची टीका आणि दुसरीकडे मनोज जरांगे यांच्यावर भेट देण्यासाठी निघण्याची नामुष्की ओढवली आहे. त्यामुळे नाईलाजाने लगेचच मनोज जरांगे यांनी जमदाडे कुटुंबियांना भेटण्याचा नियोजित दौरा ठरवला आहे. त्यामुळे अमोल खुणे मनोज जरांगे यांच्यापेक्षा समाजहित जोपासणारा कार्यकर्ता खरा मराठा योद्धा म्हणून अमोल खुने यांच्याकडे पाहिजे जात आहे.
