बीड : केज च्या देवगाव येथील रहिवाशी धनंजय नागरगोजे यांनी १५ मार्च रोजा बीड शहरातील स्वराज नगर परीसरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पंढरपोशी नेता विक्रम नागरगोजे याच्या छळाला कंटाळून नागरगोजे यांनी आत्महत्या केली. आत्महत्येच्या दोन दिवसांपासून धनंजय नागरगोजे हे फेसबुक पोस्ट करून आवाहन करत होते. आत्महत्या करूच वाटत नव्हती म्हणून की काय ते जवळच्या लोकांना आवाहन करत होते मात्र तरीसुद्धा दगडाचे काळीज असलेल्या विक्रम मुंडेला पाजर फुटला नाही.
आणि अखेर धनंजय नागरगोजे यांना आत्महत्या करावी लागली.
धनंजय नागरगोजे यांनी स्वतः फेसबुक पोस्ट लिहून ही माहिती दिली आहे. त्यांनी स्वतःच्या तीन वर्षाच्या लेकीला माफी मागणारी पोस्ट लिहली आहे आणि त्यात सर्व राक्षसांचा उल्लेख केला आहे.
धनंजय नागरगोजे यांनी लिहिलेली पोस्ट जशास तशी
श्रावणी बाळा तुझ्या बापूला शक्य झालंच तर माफकर, मी माफी मागायच्या पण लायकीचा नाही
बाळा तुझ्या बाबतीत मी खूप स्वप्न पहितली होती पण त्या स्वणाना स्वप्नातच ग्रहण लागले काय करू माझ्या मनात कधी स्वार्थ आलाच नाही .कधी मी कुणाला दोन रू ला फसवल नाही किंवा कुणाचं कर्ज पण घेतल नाही .
श्रावणी बाळा शक्य झालंच तर कर एकदा तुझ्या बापूला माफ कारण तुला मी एकट्याला सोडून जात आहे .तुला आजुन काही कळत नाही तुझ वय आहेच किती, तीन वर्षे तुला काय कळणार ज्यांना कळायला पाहिजे त्यांना बापू कधी कळला नाही.बाळा बापूंनी कधीच कुणाचं नुकसान केलं नाही सर्वांसोबत चांगला लवागला पण या नालायक राक्षस लोकांनी माझा अंधारातून खूप छळ लावला आहे. विक्रम बाबुराव मुंडे
,विजय विक्रम मुंडे
अतूल विक्रम मुंडे
आणि
त्यांचे कार्य करते
उमेश रमेश मुंडे
गोविंद नवनाथ आव्हाड
ज्ञानेश्र्वर रजेभाऊ मुरकुटे
या सर्वांनी माझा खूप छळ लावला आहे .मला हे
हाल हाल करून मरणार आहेत
मला मारण्याचं करणं म्हणजे मी फक्त विचारलं होत की ,मी तुमच्या शाळेवर गेली 18 वर्षे झालं काम करतोय अजून मला
पगार नाही आता पुढे काय करायचं त्यावर विक्रम बप्पा म्हणले तू फाशी घे म्हणजे तू मोकळा आणि मी पण दुसरा तुझ्या जागेवर कर्मचारी भरायला मोकळा हे एकूण माझ्या पाया खालची जमीनच सरकली
आणि तीतून पुढे या लोकांनी मला त्रास देण्यास सूर्वात केली
श्रावणी बाळा हे सर्व राक्षस आहेत या राक्षसा मुळेच मी तुझ्या पासून दूर जात आहे.
तुला एकदा पाहण्याची माझी खूप इच्छा होती पण मी एक दळभद्री बाप तुझ्या वाट्याला आलो.
काय करू माझ्यापाशी कोणता पर्याय या लोकणी ठेवला नाही .
बाळा डोळ्यातलं पाणी थांबत नाही. पण त्याग केल्या शिवाय पर्याय नाही
श्रावणी मला माफ कर माफी मागण्याच्या पण लयकीचो नाही मी तरी पण शक्य झालं जेव्हा तुला कळेल तेंव्हा माफ कर आता मी थांबतो खूप त्रास होतोय मला
विक्रम बाबुराव मुंडे
विजयकांत विक्रम मुंडे
अतूल विक्रम मुंडे
उमेश रमेश मुंडे
ज्ञानेश्वर राजेभाउ मुरकुटे
गोविंद (अमोल) नवनाथ आव्हाड
हे सर्व मझ्या माझ्या आत्महत्येला कारणीभूत आहेत .कारण यांनी मला खूप त्रास दिला आहे यांच्या मुळेच मी माझे जीवन संपवित आहे
आत्ता पर्यंत मी कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मोठ्या मनानी माफ करावे.
सर्वांना माझा शेवटचा राम राम
धनंजय नागरगोजे यांनी आत्महत्या करून देखील विक्रम मुंडेंची मग्रुरी गेली नाही तो कुटुंबियांना आधार देण्याऐवजी त्यांना दम देत असल्याची चर्चा परिसरात आहे. धनंजय नागरगोजेच्या मृत्यूला कारणीभूत विक्रम मुंडे आणि त्याचे सहकारी आहेत त्यामुळे त्याच्यावर आणि सहकाऱ्यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली जात आहे.
धनंजय नागरगोजे यांचा अंत्यविधी झाला आहे मात्र अद्याप कुठलीही कारवाई झाली नसल्याची देखील माहिती मिळत आहे. मग अद्याप कोणी तक्रार केली नाही का? नागरगोजे यांच्या नातेवाईकावर दबाव आहे का? असा संशय व्यक्त होतोय.